इस्लाम आणि लव जिहाद

लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्यासाठी इस्लामेतर व्यक्तीला उद्युक्त करणे आणि जो याला विरोध करील त्याच्याशी युद्ध करणे वा पुकारणे." अशी सरळ जिहादची व्याख्या आहे. इस्लाममध्ये त्यांच्या धर्मग्रंथांचा आधार घेतला तर जिहादचे बरेच प्रकार आहेत, जसे की तलवारीने, मौखिक म्हणजे बोलून बुद्धिभेद करून आणि मनाने म्हणजे मनातल्या मनात एखाद्याची निंदानालस्ती चालवणे इत्यादी. कुराण ९.७३ (सुराह ९ आयत क्रमांक ७३) व ६६.९ सांगतात, "काफिर (इस्लामेतर) लोकांशी जिहाद करा, त्यांच्यावर सक्ती करा." जिहादचा उगम अश्या कुराण व हदीज मधील संदर्भातून आहे. त्यामुळे इस्लाम व कुराण म्हणजे पवित्र व काही मुसलमान तेवढे वाईट असतात या भ्रमात कोणीही राहण्याचे कारण नाही. कारण जिहादची जडच कुराण हा इस्लामिक धार्मिक ग्रंथ आहे! पुढे जाऊन कुराण ३.२८ आणि ४७.४ नुसार आदेश देते की, काफ़िरांशी दोस्ती करू नका. आणि काफ़िरांची गर्दन उडवा. त्यामुळे तुमचा आज असणारा मुसलमान मित्र वरून आदेश/फतवा निघताच तुमचीच गर्दन उडवायला मागेपुढे बघणार नाही.


आता आपण लव्ह जिहाद वर बोलू. सदर जिहाद इस्लामेतर स्त्रियांना प्रेम जाळ्यात ओढून, black mail करून, फसवून त्यांचे इस्लामीकरण करणे तसेच सोबत इस्लामेतर धर्मांच्या प्रजनन व कुटुंब व्यवस्थेवर आघात करणे या उद्देशाने केला जातो. कारण स्त्री ही प्रजनन व वंश विस्ताराच्या प्रमुख भूमिकेत असते. त्यामुळे हा मुळांवर घाव घालणारा आणि मानसिक खच्चीकरण करणारा जिहाद आहे. पुढे अश्या फसलेल्या स्त्रियांचा लिलाव करणे, रखेल बनवणे इत्यादी प्रकार घडतात. ही इस्लामी परंपरा इस्लामचा उदय झाल्यापासूनची आहे. स्वतः प्रेषिताने अश्या महिलांना रखेल बनवून ठेवले होते याचे संदर्भ हदीज मध्ये पडून आहेत. आफताब सुद्धा श्रद्धा वालकरचा खून केल्यावर - मला स्वर्गात जागा मिळेल, ७२ हुरे मिळतील हीच भाषा करत होता. कारण हीच भाषा कुराण व हदीज मधून शिकवली जाते. 


एक समाज म्हणून हे आव्हान संपूर्ण सनातन-हिंदूंसमोर आहे. परंतु ब्राह्मण समाज एक प्रभावशाली समाज असल्याने या समाजातील स्त्रियांवर जास्तीची वक्रदृष्टी असणे साहजिक आहे. आम्हाला भगवद्गीता वाचून माहिती नसते, वाचली तरी कर्मयोग अध्यायापलीकडे समजून घ्यायच नसतं. आताच्या १५-३० वयोगटातील मुलांना रामायण-महाभारत माहिती नसते. बाकी वेदाध्ययन फार लांबची गोष्ट आहे. अश्या स्थितीत आपल्या पौराणिक पात्रे आणि देवदेवतांवर वाट्टेल ती चेष्टा करणे. बुद्धिभेद करणारा तर्क उभा करून स्वधर्माची टवाळी करणे असे विषय चालतात. स्वतः घरातील मंडळी आपल्या पाल्याकडे धार्मिक बाबींवर चर्चा करणे हे विषय टाळतात. आणि कोणी पाल्याने विचारलंच तर अभ्यासावर/कामावर लक्ष दे, या भानगडीत तू पडू नकोस अशी ऑर्डर निघते. यात मग पुढे जाऊन वेगळं काहीतरी हवं असत. अश्यावेळी भावनेचा बुरखा पांघरलेला अब्दुल समोर येतोच. कारण अश्याच सावजाची तो शिकारी वाट बघत असतो. मग असा अब्दुल तुमचा धर्म/देव कसा निरुपयोगी व मर्यादित आहे व आमचा अल्लाह किती पवित्र व अमर्यादित आहे हे सांगायला सुरुवात करतो. आणि मग आम्हालाही ते हळूहळू पटू लागते. कारण इस्लाम हा शब्द उच्चारायला सुद्धा आमच्या घरात बंदी असते. अश्यावेळी त्याबद्दल जास्तीचे कुतूहल वाटत जाणे हा मानवी स्वभाव आहे. आणि कुठे असा बोलायचा प्रसंग आलाच तर आम्हाला सत्यापेक्षा धार्मिक सलोखा जास्त महत्वाचा वाटू लागतो. थोडक्यात आम्हीच आम्हाला कमकुवत केले आहे. आम्हीच आमच्या पायात बेड्या घालून ठेवल्या आहेत. कोणीतरी म्हटलेलंच आहे की समोरचा तुम्हाला तोवर अपमानीत करू शकत नाही जोवर तुम्ही त्याला मदत करत नाही. मग अशा तुमच्यातील त्रुटींचा फायदा एखाद्याने घेतला तर फक्त तो दोषी अस म्हणता येणार नाही. कारण आमचे संरक्षण आम्ही केलं पाहिजे. चोर हा चोरी करणारच, आपण आपल्या घरातील वस्तू कश्या सांभाळाव्या हे आपल्या हातात आहे. असो!


आता फार खोल न जाता सर्वप्रकारच्या जिहादी आव्हानाला तोंड देण्यासाठी दोन उपाय सांगणे मला रास्त वाटते. कारण रोगाची जास्त वेळ मीमांसा करण्यापेक्षा उपचार मला महत्वाचा वाटतो. 


१) स्वधर्माविषयी आत्मविश्वास आणि आदर

जिहादी लोक आपल्या धर्मातील संवेदनशील भागांवर बोट ठेऊन आपली दिशाभूल करण्यात आणि बुद्धिभेद करण्यात पटाईत असतात. जसे की, एवढे कोटी देव हवेत कशाला एकच पॉवरफुल नाही का? तुमचा राम स्वतःच्या बायकोचे रक्षण करू शकत नाही - तो तुमचे काय करणार? अशाप्रकारे बुद्धिभेद चालू होतो. त्यामुळे स्वधर्म जाणून घेणे, त्यावर अखंड विश्वास असणे आणि कोणत्याही स्थितीत गोंधळून न जाता थोरांकडे आपले विचार व्यक्त करणे, धार्मिक ग्रंथ स्वतः ताडून बघणे, हे काम पालक व पाल्य या दोघांनी करणे गरजेचे आहे. 


२) इस्लाम विषयी परिपूर्ण माहिती -

जसे त्यांना आपल्या धर्मातील संवेदनशील भाग माहिती आहेत तसेच आपल्याला त्यांचे संवेदनशील भाग माहिती असणे अत्यंत गरजेचे आहेत. अशी माहिती सोशल माध्यमात उपलब्ध आहे. बऱ्याच इस्लाम सोडलेल्या लोकांनी यावर भाष्य करून ठेवलेलं आहे. कुराण-हदीज च्या प्रति इंटरनेट वर फुकट उपलब्ध आहेत. इस्लामची खरी माहिती तुम्हालाही माहिती असेल तर असा कोणी जिहादी समोर आल्यास त्याला तोडीस तोड उत्तर मिळाल्यावर तो परत तुमच्या नादी लागणार नाही. आणि हे मी स्वानुभवातून सांगत आहे. त्यामुळे अश्या जिहादचा अभ्यास त्यांची विचारधारा तपासणे आणि त्याला प्रतिउत्तर तयार ठेवणे हे आपल्या हातात आहे.


वास्तविक एक तलवारीच्या जोरावर असलेला जिहाद सोडला तर इतर सर्वप्रकारचा जिहाद तुम्ही फक्त इस्लाम वाचून म्हणजेच कुराण व हदीज वाचून मोडून काढू शकता आणि हे सहज शक्य आहे. एकदा कुराण समजलं तर मग अब्दुल समजायला आपल्या मुलीला फार अवघड जाणार नाही. त्यामुळे ही डोंगरासारखी वाटणारी समस्या एकदम छोटी वाटू लागेल. आणि याचा नायनाट किमान समाज पातळीवर करता येईल.

धन्यवाद.

द काश्मिर फाइल्स - एक वेगळी बाजू

द काश्मिर फाइल्स

30 वर्षांनी का होईना, पण एक क्रूर सत्य दाखवण्याच धाडस कोण तरी करून दाखवलं! त्यासाठी खरंतर विवेक अग्निहोत्री टीम चे अत्यंत आभार! 
तस तर Social मीडिया वर बऱ्याच पोस्टीं पडत आहेत, पण मला थोडी वेगळी बाजू मांडायची आहे. आणि ती म्हणजे त्यातून दाखवलेल्या विविध सिम्बॉलीक वाक्यांची! खरतर हा चित्रपट काढणे हेच शिवधनुष्य होतं. कारण इतक्या घटना दोन अडीच तासात सामावून घेणं त्यांची विविध पैलूंनी रेखाटन करणं हे खरंच अवघड होतं, आणि यासाठी एक दिग्दर्शक म्हणून अग्निहोत्री च कौतुक करावं तितक थोडं आहे.
आता विविध पैलू-
१. कश्यप आणि काश्मीर- खरंतर काश्मीर हे नाव कुणामुळे पडलं, त्याचा मागील इतिहास काय, अगदी शंकराचार्य पासून ललितादित्य पर्यंत काश्मीर कसा समृद्ध होता हे सांगितलं. हे खऱ्या अर्थाने गरजेचं होतं. फ्री काश्मीर म्हणून विधवा विलाप करणाऱ्या लोकांना ही चपराक आहे.

२. काश्मिरी पंडितांनी तर कधी हातात बंदूक घेतली नाही-
वास्तविक, एक narrative ,चालवला गेला, आजही चालवला जातो की गरिबी मुळे, Suppress किंवा oppress केल्याने काश्मीर युथ भडकतो आणि बंदूक घेतो असा एक गोंडस युक्तिवाद मीडिया मध्ये केला जातो. तो या एका वाक्यात ध्वस्त केलेला आहे. Oppress तर काश्मिरी पंडित पण झाले, पण त्यांनी कधी बंदुका घेतल्या नाहीत हातात! इथे विषय संस्कारांचा आहे!

3. ज्याचा शैक्षणिक केंद्रावर ताबा तो जगावर बौद्धिक राज्य करू शकतो- खरतर हे वाक्य काश्मीर पूर्वी विद्या आणि बौद्धिक याच प्रमुख केंद्र होत आणि त्याच्यावर यासाठी हल्ला केला अस सांगितलं गेलं, पण माझ्यामते याचा खरतर रोख पूर्णपणे JNU, AMU सारख्या संस्थांकडे होता हे कळून येतं, कारण JNU या संस्थेतून केंद्रीय इतिहास लिहिला जातो, research होतात, काही प्रमुख degree ह्या तिथूनच दिल्या जातात आणि विस्थापित झाल्यानंतर देशातील कंमुनिस्ट लोकांनी तिथं हळूहळू जम बसवला आणि आपला Narrative पसरवला, आणि सोयीस्कर इतिहास लिहिला गेला, जस की जम्मू काश्मीर मध्ये ललितादित्य बद्दल, कश्यप ऋषींच्या बद्दल काही शिकवलं जातं नाही. तिथं महाराणा प्रताप, विक्रमादित्य, चंद्रगुप्त बद्दल फारसं सांगितलं जाणार नाही.

४. सरकार कोणतंही असो system आपली आहे- 
System म्हणण्यापेक्षा आपण Eco सिस्टिम म्हणू. तस 2000 साली सुद्धा सरकार BJP च होत पण Eco system तीच होती. 2014 पूर्वीपासून एक अशी eco system जी केंद्रात आणि राज्यात कोण मंत्री होणार हे ठरवत असे, अगदी पंतप्रधान पदाला बगल देऊन. ही System आजही बऱ्याच भागात जिवंत आहे, आणि त्यांची Establishment आहे. यालाच प्रस्थापित म्हणतात!

५. आताच्या पंतप्रधान (मोदी) ना मोहोब्बत नकोय, जी नेहरू, वाजपेयी ना हवी होती-
जम्मूरियत, काश्मीरीयत करत नेहरू पासून वाजपेयी पर्यंत पंतप्रधान झाले. पण काश्मीर चा हा नरसंहार त्यावर Solution कोण शोधू शकलं नाही, आणि भावनेच्या भरात किंवा प्रसिद्धी आणि स्वतःच्या प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी ठोस पावलं कोणी उचलली नाही. पण मोदी हा असा नेता निघाला ज्याला जम्मू आणि काश्मीर हवंय, जम्मूरियत, काश्मीरीयत वगैरे बोलघेवडे ढोंग नको, आणि 370 हटवून तेच दाखवलं गेलं, तर POK बाबत पण काही indication या सरकार ने दिले आहेत. 

६. मीडिया एक वेश्या, रखेल आहे-
एक अत्यंत क्रूर सत्य सांगण्याचे धाडस या वाक्यात आहे. चित्रपटातील पुनीत इस्सार जेंव्हा हे वाक्य बोलतो, तिथंच या चित्रपटाचं मेख आहे. मीडिया ही आजकाल पत्रकारिता राहिली नसून एक पैश्याचा धंदा करणारी मीडिया house बनली आहेत, आणि आपल्याला पैसे पुरवणाऱ्या मालकाचा अजेंडा ती चालवत असतात हे आजपर्यंत लोकांना कळलं आहेच, पण या चित्रपटात ते धडधडीत बोलून दाखवलं गेलं!

७. फक्त कश्मिरी पंडित नाही, तर दलित, ख्रिश्चन, शीख आणि इतर पण - होय जास्तीचं पलायन आणि रोख हा काश्मिरी पंडित असला तरी इतर वर्गीय लोक सुद्धा काश्मीर सोडून पळाले हे ही सत्य दाखवलं गेलं👌

८. ज्यू लोकांनी अत्याचार जगाला विसरवू दिले नाहीत- 
खरंतर चित्रपटात याच उत्तर नीटसं दिल नाही पण इथे देतो. ज्यू जेंव्हा जेरुसलेम किंवा नाझी जर्मनी मधून पळाले ते इतर युरोप व अमेरिकेत स्थायिक झाले पण त्यांच्याकडे बुद्धिमत्ता होती, आणि त्यांचा विज्ञान, संस्था शैक्षणिक संस्था इथं आधीपासूनच ताबा होता त्यामुळे त्यांचा अत्याचार दाबणार कोण? आइन्स्टाइन हा स्वतः ज्यू होता. असे बरेच शास्त्रज्ञ अमेरिकेसाठी राबत होते, त्या त्या देशासाठी राबत होते. त्यामुळे ज्यू च्या बाबतीत लागलेला नियम इथं लागू होत नाही.😢

धन्यवाद
- अनय

रसिक बलमा

   

   लताजी किंवा लता दीदी नव्हे, मला लता असंच म्हणायचं आहे. कलाकाराला अरे तुरे बोलल्याशिवाय तो आपला वाटत नाही. खरंतर हा प्रपंच मला आधीच करायचा होता. पण निमित्त असं लताच्या जाण्यातून मिळेल याची कल्पना नव्हती. मला तुझी सर्वात आवडती गायिका कोण अस विचारलं तर इतरांच्या प्रमाणेच लता हेच नाव तोंडी येईल. यात फार अप्रूप ते काय? पण मला लता तिच्या फक्त आणि फक्त निव्वळ आवाजासाठी नाही आवडत यात मला अप्रूप आहे आणि मला त्याचाच विस्तार करायचा आहे. आणि अर्थात त्यासाठीच हा लेखप्रपंच!
  सांगीतिक प्रवास भलेही १९४२ पासून झाला असेल पण लता प्रकाश झोतात आली ती 'आयेगा आनेवाला' आणि 'जिया बेकारार है' या गाण्यापासून वास्तविक ही गाणी लताच एक साधं रूप दाखवणारी आहेत. अर्थात एक नाट्यसंगीत, रागधारी एवढा मुलाहिजा घेऊन एक मराठमोळी मुलगी एवढीच या गाण्यात दिसेल. अगदी इतर सर्वसामान्य तत्कालीन गायिकांच्या प्रमाणे; परंतु त्यानंतर हळूहळू ज्या पद्धतीने ही मुलगी प्रगत होत गेली त्याची आस मला आहे. आणि ही गायिका देखील अश्या ठिकाणी पोहोचली की तिथे ध्रुवाचे स्थान सुद्धा हलले असेल.
  त्यामुळे साधारण बैजू बावरा (१९५२) च्या आधी आणि बैजू बावरा नंतर हा फरक ठळक जाणवेल. नूरजहाँ या गायिकेच्या शैलीत सुरवातीला गाणाऱ्या लताने आपली हळूहळू एक अशी शैली निर्माण केली की पुढे हजारो गायिकाच काय पण अगदी सामान्य व्यक्ती देखील लताच्या आवाजात, तिच्या शैलीत आपल्याला जमत का? असा एखादा प्रयत्न नक्कीच करून बघतो. लताने आपले उर्दू, हिंदी उच्चार व्यवस्थित व्हावेत म्हणून मेहमूद नावाच्या एका मौलाना कडून उर्दू शिकून घेतले.
  बरसात (१९४९) या चित्रपटातील सर्व गाणी शंकर जयकिशन यांनी लता कडून गाऊन घेतली आणि एक अमर युगाची सुरवात झाली. आवारा(१९५१) मध्ये एक गाणं रेकॉर्ड होणार होत 'घर आया मेरा परदेसी'. कितीही केलं तरी गाणं हवं तसं होईना शेवटी काही लोक घरी परतले, रात्री बारा वाजता एक ढोलकी वादक मिळाला आणि त्या सोबत गाण्याचे सूर देखील जुळले, गाणं लवकर रेकॉर्ड करून घ्यावं म्हणून पहाटे तीन वाजता लता ला बोलावलं स्वतः जयकिशन जाऊन घेऊन आले लता सुद्धा कोणतेही आढेवेढे न घेता आली आणि पहाटे सहा वाजेपर्यंत गाणं रेकॉर्ड झालं आणि हिट सुद्धा! ही आर्तता कदाचित कुठे पाहायला मिळेल.
   'रसिक बलमा' हे गाणं खरंतर Song of the Century अस म्हणावं लागेल. चोरी चोरी या चित्रपटातील हे गाणं ऐकताना त्यातील प्रत्येक पदर लताने ज्या तर्हेने गायले आहेत ते भलेभले मार खातील. म्हणूनच एकदा बडे गुलाम अली खां 'कम्बख़्त ये कभी बेसुरी होती ही नहीं।' असे उद्दगार काढले होते. रसिक बलमा या गाण्याला उंच पिच होता आणि ते संपूर्ण गाणं तसंच गायचं होतं. आणि संगीतकार जयकिशन यांना देखील हे गाणं फक्त लता साठीच आहे याची खात्री होती आणि त्यांनी ते करूनही घेतलं. वयाच्या पाचव्या वर्षी मा. दीनानाथ मंगेशकरांच्या शिष्याला त्याची चूक दाखवून तो पुरीया धनश्री त्याच्याचसमोर चूक दुरुस्त करून गाऊन दाखवून, आपल्याला एवरेस्ट ठेंगणा आहे हेच दाखवून दिले.
प्रतिभा ही साधनेतून उपजत असलेल्या गुणांना सजवून येत असते. यासाठी एकच किस्सा पुरेसा आहे. कुठेतरी संगीत कार्यक्रम होता, ऑर्केस्ट्रा, सेट अप सगळ काही तयार....लता स्टेज वर उभी राहते prelude सुरू होतो... मुखडा सुरू होतो तोच अचानक ती थांबते आणि मागे वळूनही न पाहता म्हणते,
चार नंबर का तबला; ताल ठीक किजीए।
बस्स, प्रतिभा ती काय असावी....
.......भाग १.....

श्री गणेशा

भगवद्गीता! अथांग सागर आहे, पण तसा समजायला सहज सोपा! याची अनुभूती संपूर्ण सागर बघून जेवढी येते, तेवढीच त्या समुद्राच्या एका थेंबानेही येते. इ...