सांख्ययोग




अर्जुनाचा विषाद ऐकून प्रथम श्रीकृष्ण म्हणतात, एका प्रगतशील मूल्यांचे ज्ञान असणाऱ्या मनुष्याला असा विचार शोभत नाही. हा नामर्दपणा आहे! हे मानसिक दुबळेपण आहे..! आणि ह्या गोष्टी मनुष्याच्या दुष्कीर्तीस कारणीभूत होतात..! हे ऐकून अर्जुन द्विधा मनस्थितीत म्हणतो स्वकीयांच्या रक्ताने हे हात माखलेले चांगले दिसणार नाहीत, याने कोणता धर्म साध्य होणार आहे? अशांत झालेला अर्जुन भगवंताकडे याचना करतो की "मला उपदेश करा"

भगवंत उत्तरादाखल म्हणतात, हा शोक व्यर्थ आहे कारण ज्ञानी लोक जिवंत अथवा मेलेल्यांच्या बद्दल शोक व्यक्त करत नाहीत. कारण अश्या लोकांना आत्मा आणि भौतिक देह यातील फरक माहिती असतो, आत्मा हा निरंतन व शाश्वत आहे याचे ज्ञान असते! म्हणूनच भगवान म्हणतात,' ज्याकाळी मी, तू व हे राजे नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि यापुढे होणार नाही असाही कोणता काळ नाही..!'

भगवंत हे विश्लेषण करताना म्हणतात, नाम व गुण हे कायम राहतात. एकाचे दुसऱ्यात रूपांतर होत राहते, व्यक्त स्थितीतून अव्यक्त स्थितीत तर अव्यक्त स्थितीतून व्यक्त स्थितीत रूपांतर होण्याची प्रक्रिया कायम चालू असते..! जेंव्हा आपण म्हणतो की एखादी वस्तू नष्ट झाली तेंव्हा ती खऱ्या अर्थाने नष्ट झालेली नसून ती अव्यक्त स्वरूपात गेलेली असते...! उदाहरण द्यायच झालं तर बल्ब चा शोध लागला याचा अर्थ तो त्या आधी लागला नसता असंही नाही किंवा पुढे लागला नसता असंही नाही. थोडक्यात बल्ब बनण्यासाठी लागणारे गुण जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा त्याला व्यक्त स्वरूप प्राप्त होते..! म्हणूनच याला वेळेचं बंधन नाही! आणि म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला "तू त्रिगुणतीत हो" असा उपदेश करत आहेत..!

भगवंत पुढे म्हणतात, मनुष्य गुणकर्माने बाध्य असतो आणि म्हणूनच कर्मबंधनातून मुक्तता हे मनुष्य ध्येय आहे. म्हणूनच कोणत्याही फळाची, आसक्तीची अपेक्षा न ठेवता कर्म करणे हेच योग्य होय! जो जन्मला आहे त्याला मृत्यू आहे. पण म्हणून कर्तव्य कर्माचे पालन टाळणे योग्य नाही! आत्मा हा अमर्त्य असल्याने शोक करण्याची आवश्यकता नाही..! म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, क्षत्रिय म्हणून जे तुझे कर्तव्य आहे तोच तुझा धर्म आहे त्याचे पालन हाच मोक्षप्राप्ती देणारा मार्ग आहे. सर्व चांगल्या अथवा वाईट कर्माच्या बंधनातून मुक्तता हाच योग आहे!

थोडक्यात, स्वर्गप्राप्ती हे सुद्धा ध्येय नाही; कारण चांगल्या कर्माने स्वर्ग प्राप्ती होईल खरी परंतु ती सुद्धा कर्माने बाध्य असेल; तो मोक्ष नाही, चांगले कर्म केले म्हणून त्याचे चांगले फळ मिळेल पण ते सुद्धा कर्मच आहे त्यात देखील चांगलं काहीतरी मिळण्याची आसक्ती आहे..! म्हणून भगवंतांनी चांगल्या कर्मापासून सुद्धा मुक्ती मिळवण्यास सांगितले आहे.! यासाठी कर्मयोग, भक्तियोग गरजेचा आहे...!

~२~

अर्जुन विषाद योग



महाभारत ही न्याय आणि अन्याय, नीती व अनीती, सत्य आणि असत्य, विचार आणि कुविचार, धर्म आणि अधर्म यांच्यातील द्वंद्व होय अशी माझी धारणा आहे. नाना प्रसंग, घटना यांना सामोरे जाऊन शेवटी कृष्ण शिष्टाई देखील अयशस्वी होते तेंव्हा युद्ध होते. रामायणात राम रावणाला सर्व बाजूने समजावण्याचा, शिष्टाईचा यत्न करून पाहतो आणि सर्व मार्ग जेंव्हा बंद होतात तेंव्हा युद्ध सुरू होते.. महाभारतात देखील तेच आहे कृष्ण अगदी पाच गावांवर पांडव समाधानी असतील हे सांगतो तेंव्हा अहंकारी दुर्योधन सुई च्या अग्राइतकी देखील जमीन द्यायला नकार देतो! आणि सर्व मार्ग संपतात तेंव्हा युद्ध स्थिती निवडली जाते.

ही सनातन वैदिक धर्माची शिकवण आहे..! हीच अहिंसा आहे..!

अर्जुनाला ऐन युद्धात आप्तेष्ट बघून मोह अनावर होतो आणि तो आपलं गांडीव धनुष्य खाली ठेवतो..! आणि श्रीकृष्णाला म्हणतो "हे पाप मी करणार नाही, याने कुळाचार, कुळधर्म नष्ट होईल. पुढे जाऊन हे जग मला लोभी म्हणेल..! आणि शस्त्र घेऊन स्वकीयांशी लढण्यापेक्षा प्रतिकार न करता स्वकीयांच्या कडून मरण आले तरी चालेल..!" अश्या प्रकारची मानसिकता अर्जुनाच्या मनात निर्माण होते आणि यालाच तो अहिंसा, धर्म समजून बसतो.
धर्म, नीती, न्याय, सत्य, अहिंसा, विचार यांच्या बद्दल भ्रम झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण पुढील सतरा अध्यायात संपूर्ण धर्म सांगतात..! कर्तव्याची आठवण करून देतात! आपल्या प्रेमळ, अमोघ शैलीत, अगम्य स्वरूपात भगवंतांचे हे भाष्य प्रत्येक मनुष्याला मंथन करायला लावणारे आहे. कारण संपूर्ण जगात हे एकमेव असे भाष्य आहे ज्यात "भगवान उवाच" आहे..! अर्जुनाने मांडलेला विषाद आणि त्यावर विशद केलेले भगवंताचे भाष्य हे स्पृहणीय आहे. या अर्जुन-कृष्णाच्या संभाषणातून मला जी भगवद्गीता समजली आहे आणि समजते आहे त्याचे विवेचन रोज मांडायचे आहे..!

~१~

इस्लाम आणि लव जिहाद

लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्...